नवी दिल्ली – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकार तवांग प्रकरणावर पडदा टाकत असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.
This amounts to a coverup by the Modi government. It is why a debate in Parliament is essential where the PM should answer the questions. Why is the truth being hidden from our people? https://t.co/UPNJKjb2O3
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 15, 2022
सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, “हे मोदी सरकारने झाकून ठेवले आहे. त्यामुळे संसदेत चर्चा आवश्यक आहे, जिथे पंतप्रधानांनी प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आपल्या लोकांपासून सत्य का लपवले जात आहे?” एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत ओवेसी म्हणाले की, ‘जर एका ब्रिटिश वृत्तपत्राचा हा अहवाल खरा असेल तर याचा अर्थ चीनच्या सीमेवर जी परिस्थिती सांगितली जात आहे त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. लडाखपासून अरुणाचलपर्यंत हे प्रकरण गंभीर आहे. याचे उत्तर सरकारने द्यावे.’
पंतप्रधानांवर घणाघाती हल्ला चढवत ओवेसी यांनी ट्विटरवर लिहिले, “आमच्याकडे मजबूत सैन्य आहे पण ते अत्यंत कमकुवत पंतप्रधान आहेत. ते चीनचे नाव घेण्यासही घाबरतात, देश आणि नेत्याबद्दलच्या प्रश्नांपासून दूर जातात आणि आता ते झाकत आहेत. मोठे संकट.” या प्रकरणाचे उत्तर चर्चेतूनच मिळू शकते, पण सरकारची भूमिका पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे ओवेसी म्हणाले.