सातारा : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधील सर्व सलूनची दुकाने शनिवारपासून दि. २१ सलग तीन दि. २३ पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी दिली.
हा निर्णय जिल्हयातील प्रमुख मंडळींशी चर्चा करून महामंडळाचे राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या सूचनेनुसार घेतला आहे. जिल्हयात सुमारे साडेपाच हजार सलुनची दुकाने आहेत. ती ही मोक्याच्या ठिकाणी बाजारपेठेत आहेत. त्यामुळे जनहितासाठी आपले कर्तव्य म्हणून या बंदमध्ये सर्व सलुन व्यावसायिक सहभागी होतील.
यामध्ये जिल्ह्यात तीन दिवस पुर्णपणे सलुन दुकाने बंद राहणार असली तरी त्या पुढे प्रत्येक तालुक्यात तेथील परिस्थितीप्रमाणे यामध्ये कोरेगांव मध्ये पाच दिवस, रहिमतपुरमध्ये चार दिवस, जावळी तालुक्यात आठ दिवस त्या त्या प्रमाणे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक तालुक्यात सलुन ची दुकाने बंद राहणार आहेत.