नवी दिल्ली: देशांत गेल्या 24 तासांत एक हजार 396 बाधित सापडले असून त्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 27 हजार 892 वर पोहोचली आहे. तर काल एका दिवसांत 381 जण बाधा मुक्त झाले असून त्यांचे प्रमाण आता 22.17 टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण सातत्यपूर्ण रितीने वाढत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नियमित वार्तालापात देण्यात आली.
केंद्र म्हणतंय…
- रविावर सकाळपासून एक हजार 386 बाधितांची भर. एकूण संख्या 27 हजार 892 वर
- सहा हजार 184 जण बाधामुक्त, एकूण बाधितांच्या तुलनेत 22.17 टक्के प्रमाण
- 16 जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांत एकही नवा बाधित नाही
- 25 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 85 जिल्ह्यात 14 दिवसांत एकही बाधित नाही
- कोणताही समाज अथवा क्षेत्राला करोना प्रसारासाठी दोष देता येणार नाही
- वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्ष्य बनवू नये
- सुमारे दीड कोटी लोकांना स्वयंसेवी संस्था आणि शासनाच्या माध्यमातून रोज भोजन
बरे झालेल्या बाधितांपासून करोनाचा प्रसार होत नाही. आपला लढा करोना विरूध्द आहे बाधितांविरोधात नाही. आपण त्यांना वर्ज ठरवल्यास तपासणीसाठी कोणी पुढे येणार नाही.
लव अग्रवाल, सहसचिव, आरोग्य मंत्रालय
देशातील 80 टक्के गव्हाची काढणी झाली आहे. 80 टक्के घाऊक बाजारपेठा कार्यरत आहेत. मनेरेगासारख्या योजनांमुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधीचा ग्रामीण भागातील तरूणांनी लाभ घ्यावा.
पुण्या श्रीवास्तव, सहसचिव, केंद्रीय गृहमंत्रालय