वॉशिंग्टन- गेल्या वर्षभराच्या काळात सर्वच जगाला करोना महामारीचा फटका बसला असला तरी सर्वात जास्त परिणाम मध्यमवर्गाला बसला आहे १९९०च्या दशकानंतर प्रथमच जगभरात मध्यमवर्गीयांची संख्या घटली आहे.
विकसनशील देशातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी अशी कबुली दिली आहे कि या महामारीमुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या माध्यमातून याबाबतचे संशोधन करण्यात आले गेल्या वर्षी ज्या लोकांचे दैनिक उत्पन्न १० ते ५० डॉलर्स म्हणजेच ७३० ते ३६५० रुपये होते अशा लोकांचे संख्या तब्बल ९ कोटीने घटली आहे.
अशा मध्यमवर्गीयांची संख्या आता २५० कोटीवर स्थिरावली आहे. दुसरीकडे ज्या लिकांचे दैनिक उत्पन्न २ डॉलर्स म्हणजेच सुमारे १४६ रुपये होते अशा लोकांची संख्या तब्बल १३ कोटींनी वाढली आहे. तर ज्या लोकांचे दैनिक उत्पन्न ५० डॉलर्स किंवा ३६५० रुपयांपेक्षा अधिक आहे. अशा लोकांचा मध्यमवर्गात प्रवेश झाला असून ती संख्या ६ कोटी २० लाख आहे.
म्हजेच करोना महामारीचा फटका एकूण १५ कोटीपेक्षा जास्त मध्यमवर्गीयांना बसला आहे हा आकडा फ्रांस किंवा जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. इतिहासात अशी उदाहरणे खूपच कमी आढळतात अशी माहिती या संशोधनाचे प्रमुख राकेश कोचर यांनी दिली आहे.