नगर -नगर जिल्ह्याने आज करोनाबाधितांच्या संख्येत 54 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असल्याचे वास्तव आहे. तथापि, मागील दोन दिवसांत करोनामुळे नगर जिल्ह्यात तब्बल 22 जणांचा बळी गेला असल्याचे सरकारी आकडेवारीवरुनच आज स्पष्ट झाले.
जिल्ह्यात आज 250 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 51 हजार 500 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.06 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 353 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1841 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 51, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 109 आणि अँटिजेन चाचणीत 193 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 15, अकोले 01, जामखेड 02, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 03, नेवासा 03, पारनेर 03, पाथर्डी 02, राहाता 07, राहुरी 02, संगमनेर 07, श्रीरामपूर 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 40, जामखेड 04, कर्जत 01, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 19, नेवासा 08, पाथर्डी 03, राहुरी 05, संगमनेर 01, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 04 आणि मिलिटरी हॉस्पिटल 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.