पुणे : लॉकडाऊन काळात महापालिकेमार्फत काही नगरसेवक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा पुरवठा करत आहेत. त्यात तेल पाकिट वाटपात अफरातफर झाल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी तेल चोरल्याचा आरोप सोशल मीडियावर केला होता. संबंधित वृत्तात तेली समाज बांधवांचा उल्लेख झाला आहे. पण, त्यातून तेली समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा दैनिक ‘प्रभात’चा हेतू नव्हता. अनावधानाने हा प्रकार घडला असून, या प्रकरणी आम्ही दिलगीर आहोत.
– कार्यकारी संपादक, दैनिक प्रभात