नवी दिल्ली – येत्या 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे, पंतप्रधानांनी नाही, असे काँग्रेस नेते म्हणाले. नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
संसदेच्या नव्या इमारतीवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने याला पीएम मोदींचा वेनिटी प्रोजेक्ट म्हटले आहे. नवीन संसद भवन त्रिकोणी आकाराच्या चार मजली इमारतीच्या स्वरूपात बांधले गेले आहे आणि ते 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे.
पंतप्रधान मोदी हे विधिमंडळाचे प्रमुख नसून सरकारचे प्रमुख आहेत, असे सांगत अनेक विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यावर आक्षेप व्यक्त केला. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष उद्घाटन का करत नाहीत, असा सवाल AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.
लोकसभा सचिवालयाच्या म्हणण्यानुसार, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या आठवड्यात पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. 28 मे हा या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे.याच दिवशी नव्या संसदेच्या उदघाटनाचे काम पार पडणार आहे.