नगर -दिवसेंदिवस पर्यावरणात होत असलेल्या बदलामुळे त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज आहे. प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन एक झाड लावून आपण कर्तव्य बजावावे, अशी भूमिका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भिंगार शहरामध्ये भाजपाच्यावतीने वृक्षारोपण करताना ते बोलत होते. भाजपाचे शिवाजी दहिहांडे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटक सचिव ऍड. विवेक नाईक, संतोष गांधी, बाळासाहेब गायकवाड, नगरसेविका शुभांगी साठे, शहराध्यक्ष वसंत राठोड, डॉ. भंडार, महेश नामदे, अमोल निस्ताने, गणेश साठे, अंबादास देवकुळे, अंबादास घडसिंग, राकेश भाकरे, संतो, हजारे, बबन वैरागर, उमेश घडसिंग, गौतम बनसोडे, आनंद रासणे, अविनास चाबुकस्वार, लखन ननवरे आदी उपस्थित होते.
दहीहांडे म्हणाले, “”वृक्षारोपण ही योजना अंमलात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही योजना फोटोपुर्ते मर्यादित न राहता, त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले आहे.”