पाचगणी – प्रशासनातील लोकसेवक आपल्या जबाबदारीच पालन करत सर्वसामान्य अडाणी जनतेला बाहेर येऊन अर्ज लिहून देण्याची घटना जावळी तहसील कार्यलयात आज अनेकांनी अनुभवली. परिविक्षाधीन नायब तहसीलदार मयूर राऊत यांनी बाकड्यावर बसलेल्या वृद्ध महिलेची अडचण समजावून घेत स्वतःच आपल्या हाताने निरीक्षर वृद्ध महिलेचा अर्ज भरुन तिला रेशनसंदर्भात होणारी फार दिवसाची अडचण दूर करण्याचं आश्वासन देखील दिलं. मयूर राऊत यांच्या या माणुसकीच्या दर्शनाने वृद्ध महिलेला आकाशही ठेंगणे वाटले.
जावळी तहसील कार्यालयात आपल्याला रेशन मिळावे म्हणेन गेल्या कित्येक दिवसांपासून बिभवी गावची वृद्ध महिला बाहेरील खुर्चीवर बसून जात होती. तिला असलेल्या अडचणीबाबत कोणी कधी चौकशी देखील केला नाही. परंतु, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर राऊत यांनी या वृद्ध महिलेची आस्थेवाईक चौकशी करत स्वतः आपल्या हस्ताक्षरात संबधित वृद्ध महिलेचा अर्ज भरत रेशन बाबतीत तिला होणाऱ्या त्रासावर रामबाण उपायांबाबत अधिकाऱ्यांना सूचना करत महिलेचे काम प्राथमिक तत्वावर मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी मयूर राऊत यांनी दिल्या.
प्रशासनातील जनतेचा सेवक या कर्तव्याचा विसर बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पडत असल्याचे चित्र प्रशासनामध्ये वरचेवर पाहयला मिळत असते. मात्र, मयूर राऊत यांनी वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी करत तिच्या अडचणीमधून वाट काढत त्या गरीब निराधार महिलेचे अश्रू पुसण्याकरीता केलेले काम प्रशासनातीस माणुसकी जपणारे आहे हे मात्र निश्चित.