नवी दिल्ली – सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील नियोजित कार्यक्रम सोडून नवी दिल्लीला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे.
My comments on the Hon PM’s security breach in Punjab. pic.twitter.com/h3yQFZDNEv
— Smriti Z Irani (@smritiirani) January 5, 2022
पंतप्रधानांच्या नियोजित मार्गावर निदर्शने सुरू झाल्याने उड्डाण पुलावर मोदी यांना सुमारे 15 मिनिट अडकून पडावे लागले. असं असतानाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंजाब सरकारवर टीका केली. याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या,’पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेस पक्षातील जे लोक मोदींचा द्वेष करतात. त्यापुढे म्हणाल्या, काँग्रेस पक्ष देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते. असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंजाब सरकावर टीका केली आहे.म्हणाले, ‘पंजाबमध्ये जे काही घडलं ते गोंधळ आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील बेजबाबदारपणाचं लक्षणं आहे. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या सरकारने या प्रकरणासाठी देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे’ या घटनाक्रमाबद्दल पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पंजाब सरकारवर निशाणा साधला.