डोर्लेवाडी – मेखळी सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना हि मेखळी, सोनगांव, झारगडवाडी, डोलेॅवाडी या चार गावासाठी वरदायिनी ठरत आहे. या पाणी पुरवठा योजनेमुळे चार गावातील नागरिकांचा कायमचा बारमाही पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
मेखळी, सोनगांव, झारगडवाडी, डोलेॅवाडी या गावासाठी ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वरदान ठरत आहे.
काही वर्षांपूर्वी या चारही गावामध्ये पिण्याच्या पाण्याची फार टंचाई असायची पाण्यासाठी बायकांना मुलाबाळांसह विहीर, आड नदी या ठिकाणी वणवण फिरावे लागत होते. पण ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 2005 साली झाल्यापासून या चारही गावाचा बारमाही पाणी पिण्याचा प्रश्न सुटला आहे. ही योजना चालवण्यासाठी शासन पूर्वी अनुदान देत होते. यात शासनाने विजबिलामध्ये पूर्णपणे तरतुद करावी अशी मागणी ही योजना चालवणाऱ्या कमिटीकडून होत आहे.
ग्रामस्थांनी सुध्दा जादा पैसे भरण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. आपण बाहेर गेलो तर पाणी बाटली वीस रुपये देऊन विकत घेतो. परंतु ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना हजारो लिटर पाण्याला वषाॅला एक हजार रुपये पाणीपट्टी आकारते म्हणजे दिवसाला दोन ते तीन रुपये आकारते. ही योजना चालू ठेवायची असेल तर ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. शासनानेही या योजनेसाठी विज बीलामध्ये पूर्णपणे तरतूद केली पाहिजे अशी मागणी होत आहे.
मार्च, एप्रिल, मे हे अति उनहाळ्याचे महिने असतात आता या साठवण तलावामध्ये ९० टक्के पाणीसाठा उपलब्द आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी या तलावात ४० दिवसाला पाणी सोडले जाते. यामुळे हा उन्हाळयात चारही गावातील नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाही, अशी परिस्थिती सद्या आहे मात्र चारही गावातील नागरिकांनी वेळेत आपली पाणीपट्टी भरून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सहकार्य करावे जेणेकरून ही पाणी योजना कुठलाही खंड न पडता सुरळीत चालेल.
– शहानूर शेख ( झारगडवाडी ग्रामविकास अधिकारी )