मुंबई: महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामागे कयार हे वादळ कारणीभूत होते. परंतु, आता कयार नंतर ‘महा’ चक्रीवादळचाही कोकण किनारपट्टीवर धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळ महा’मुळे अलीकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता येत्या २४ तासांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, ही प्रणाली वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील. येत्या ४८ तासांत कोकणासह, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.