नवी दिल्ली: अनलॉक तीनच्या पाशर्वभूमीवर हॉटेल आणि साप्ताहिक बाजार प्रायोगिक तत्वावर सुरू ठेवण्याच्या आप सरकारचा निर्णय दिल्लीवचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी फिरवला. करोनाची भीती अद्याप संपलेली नाही. स्थिती अद्याप चिंताजनक आहे, असे बैजल यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ म्हटले आहे.
रात्रीची संचारबंदी उठवण्याचा आणि काही आर्थिक कृतीशीलता सुरू करण्याचा निर्णय आप सरकारने घेतला. त्यात आदरातीथ्य क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रायोगिक तत्वावर आठवडे बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे केजरीवाल सरकारने गुरूवारी घेतला होता. तो निर्णय बैजल यांनी फिरवला.