मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘द कपिल शर्मा शो’ नेहमीच चर्चेत असतो. या शोमध्ये प्रत्येक बॉलीवूड कलाकार हजेरी लावत असून या शो ला भारतातच नव्हे तर जग भारतातील लोक आवडीने पाहत असतात. या शोच्या माध्यमातून अनेक बॉलीवूड सेलीब्रिटी आपल्या चित्रपटाचे प्रोमोशन करीत असतात. अनेकदा या शोचे वाद देखील चर्चेत राहिले. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पडतात. परंतु आता हा शो लवकरच काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
कपिलला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी ब्रेक हवा आहे. त्याच वेळी, निर्मात्यांना या ब्रेक दरम्यान शो आणि काही कलाकारांमध्ये बदल करण्याची संधी देखील मिळेल. याशिवाय कॉमेडी हा एक कठीण प्रकार आहे आणि कलाकारांना ब्रेक आवश्यक आहे. कास्टमध्ये काही बदल करायचे असल्यास ते करण्यासाठी वेळ मिळेल, यासाठी हा शो ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या शोचा शेवटचा भाग कधी प्रसारित होणार हे अद्याप ठरलेलं नाही. परंतु जूनमध्ये या सीझनचा शेवटचा भाग प्रसारित होऊ शकतो. याचबरोबर हा कार्यक्रम किती दिवसांसाठी ब्रेक घेणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र शोचे निर्माते किंवा कॉमेडियन कपिल शर्मा यांच्याकडून या अहवालावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.