नवी दिल्ली : देशातील करोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होताना दिसत आहे. कारण मागील 24 तासांत 21 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. लवकरच सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांचा आकडा पार करेल.
सध्या देशात एक लाख लाख 49 हजार 482 सक्रिय करोना रुग्ण आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या पाहता आरोग्य प्रशासनासमोर मोठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. देशात वाढत्या करोना रुग्णांसह करोनाबळींच्या संख्येतही वाढ झाली आहे. भारतात गुरुवारी दिवसभरात 60 रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
देशातील सक्रिय करोना रुग्णांची वाढती संख्याही चिंतेची बाब आहे. देशात सध्या करोना विषाणूचा संसर्ग झालेले 1 लाख लाख 49 हजार 482 सक्रिय करोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी करोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी करोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे.
गुरुवारी महाराष्ट्रात 2289 करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 2400 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. गुरुवारी सहा करोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,64,831 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे.