नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने भारतासह जगातील १८५ हून अधिक देशांमध्ये कहर केला आहे. कोविड -१९ पासून जगात दोन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर भारतात ८०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतातील तसेच जगातील अनेक देशांत लॉकडाउन लागू केले गेले आहे. भारतात 3 मे पर्यंत लॉकडाउन लागू आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील बरेच नागरिक इतर देशांमध्ये अडकले आहेत, ज्यांना सरकार परत आणण्याच्या विचारात आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय, एअर इंडिया, राज्य सरकारे आणि परदेशात भारतीय मिशनकडे संपर्क साधला असून, अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नागरिकांना परत आणण्यासाठी चर्चा सुरू आहे, परंतु देशव्यापी लॉकडाऊन संपल्यानंतरच ते परत आणले जातील. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष उड्डाणे आणि नियमित उड्डाणे यांची मदत घेण्यात येतील. परंतु लॉकडाऊनच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या मार्गांनी त्याची अंमलबजावणी केली जाईल. यासाठी नागरिकांना तिकिटांचे पैसे द्यावे लागणार आहेत.