नवी दिल्ली – तीन कृषी कायदे मागे घेताना सरकारने संसदेत चर्चेपासून पळ काढला असून हे डरपोक सरकार आहे अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आज संसदेत कोणतीही चर्चा न करताच तीन्ही कृषी कायदे मागे घेणारी विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आली आणि त्यानंतर कामकाज तहकुब करण्यात आले.
त्या संबंधात ट्विटरवर राहुल गांधी म्हणाले की सरकारला संसदेत एमएसपी या शेतकऱ्यांच्या मागणीवरील चर्चा टाळायची होती, शेतकरी आंदोलनात जे शेतकरी शहीद झाले त्यावरील चर्चाही त्यांना टाळायची होती, लखीमपुर प्रकरणातही सरकारला काहीं बोलायचे नाही. त्यामुळे त्यांनी या चर्चेतून पळवाट शोधली हे डरपोक सरकार आहे असे ते म्हणाले. जो छिने संसदपर चर्चा का अधिकार, फेल है, डरपोक है वो सरकार! अशा शब्दात त्यांनी सरकारवर हा हल्लाबोल केला.