मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा पंधरावा दिवस आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केले आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक होत विधानभवनाच्या पायर्यांवर हातात गुढी घेऊन जोरदार निदर्शने केली आहे. झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत महागाई, अवकाळी पाऊस या विषयांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.