पुणे : दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. राज्यात बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरु आहे तर तिकडे पुण्यातील गणपती विसर्जनास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कला अकादमी यांच्यातर्फे विसर्जन मार्गावर भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील रांगोळीमधून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. रांगोळीतून निसर्गावर होणाऱ्या अत्याचाराविषयी संदेश देण्यात आला आहे. पावसाचे अवेळी येणे, अचानक ऊन वाढणे यासर्व गोष्टींची सर्वांनी जाण ठेवणे गरजेचे असल्याचे या रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे.