मुंबई – करोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर आता जवळपास दीड वर्षानंतर येत्या 22 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा खो-खो स्पर्धेचे आयोजन होत आहे.
भारतीय खो-खो महासंघातर्फे भुवनेश्वर येथे 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान 40 वी कुमार व कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे (18 वर्षांखालील) आयोजन करण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची निवड केली आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर खो-खोची एकही राष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यात आलेली नाही. यंदा मार्चमध्ये महाराष्ट्रात वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु राज्यातील करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ही स्पर्धा रद्द करावी लागली.