नवी दिल्ली – आसाममधील जिल्ह्यांच्या पुनर्व्याख्याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नावर निवडणूक आयोगाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कॉंग्रेसने एका महत्त्वाच्या बैठकीत आसाम परिसीमन प्रक्रिया ही पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबतीत निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोपही कॉंग्रेसकडून करण्यात आला होता.
त्यावर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी तिव्र प्रतिक्रीया देताना, “निवडणूक आयोग कोणाच्याही सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेत नाही. एक आयोग म्हणून आमची प्रक्रिया दोन तत्वांवर अवलंबून असते. ती म्हणजे, प्रकटीकरण आणि सहभाग,’ असे उत्तर दिले आहे.
“मी दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले होते. निवेदनात जिल्ह्याच्या सीमांच्या पुनर्व्याख्याबाबत त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला आणि चर्चा करायला तयार आहोत, पण आधी आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत,’ असे आसाम कॉंग्रेसचे प्रमुख भूपेन बोरा यांनी सांगितले होते. कॉंग्रेसचे आमदार आणि आसाममधील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी सोमवारी सांगितले की, ते आता फक्त 10-15 मिनिटे देत आहेत. एवढ्या कमी वेळेसाठी त्यांना भेटून काही फायदा होईल असे आम्हाला वाटत नाही.
या संपूर्ण प्रकरणावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राजकीय पक्षांशी सल्लामसलत करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच आम्ही इतर कोणत्याही पक्षापूर्वी कॉंग्रेस पक्षालाच जानेवारीत बैठकीसाठी जास्त वेळ दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.