कामशेत – पावसाने जोरदार “कमबॅक’ केल्याने मावळातील भात शेती बचावली असल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दिवसभर सातत्याने सुरू असल्याने या भागातील वडिवळे धरण 95 टक्के भरले असल्याने वडिवळे धरणातून 6 हजार 780 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नाणे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.