नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अयोध्येतील जमीन ही हिंदुंना देण्याचा आणि मुस्लिमांना अयोध्येतच पर्यायी जागा देण्याचा निर्णय आज न्यायालयाने दिला. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचे कॉंग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे. निर्णयाचे स्वागत करत असताना कॉंग्रेसने मंदिरावरून राजकारण करणाऱ्या भाजपसाठी सर्व दारे आता बंद झाली असल्याचे टीका केली आहे.
Randeep Surjewala, Congress on #AyodhyaVerdict: Supreme Court’s verdict has come, we are in favour of the construction of Ram Temple. This judgement not only opened the doors for the temple’s construction but also closed the doors for BJP and others to politicise the issue. pic.twitter.com/N1qr6FD1We
— ANI (@ANI) November 9, 2019
सर्वोच्च न्यायालयानं राम जन्मभूमी वादात दिलेल्या निकालावर कॉंग्रेसने निकालाचे स्वागत केले. सामाजिक सौहार्दता कायम ठेवण्याचे आवाहन करत कॉंग्रेसने भाजपावर टीका केली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
#WATCH Randeep Surjewala,Congress on being asked by media if Temple should be constructed on Ayodhya site: Supreme Court ka nirnay aa chuka hai, svabhavik taur pe aapke sawal ka jawab haan mein hai, Bhartiye Rashtriye Congress Bhagwan Shri Ram ke Mandir ke nirman ki pakshdhar hai pic.twitter.com/vkg3Z1xGlA
— ANI (@ANI) November 9, 2019
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अलाहाबाद न्यायालयाने जागा तीन अर्जदारांमध्ये विभागण्याची चूक केली असल्याचे म्हटले. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल असे सांगत तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी 5 एकर जमीन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने तीन महिन्यात योजना तयार करेल. राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.