नवी दिल्ली : कझाकस्तानमधील अलमाटी विमानतळावर गेले दोन तीन दिवस अन्न पाण्यावाचून अडकून पडलेल्या 300 भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि योग्य व्यवस्थेची काळजी घेण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायलयाने परराष्ट्र मंत्रालयाला बुधवारी दिले.
न्या. सिध्दार्थ मृदूल आणि तलवंत सिंग यांनी या याचिकेची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेतली. त्यानंतर या खंडपीठाने या विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा पुरवाव्यात, त्यांना अन्न, वैद्यकीय सुविधा राहण्याची आणि वाहतुकीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरसिंगने झाली. दोन्ही न्यायधिश आपल्या घरातून या सुनावणीत सहभागी झाले. तर याचिकाकर्त्यांचे वकील फोझीया रहमान आणि सरकारचे वकील जसमीतसिंग हे आपल्या कार्यालयातून सहभागी झाले होते.
तेथे अडकलेल्या एका विद्यार्थ्यांच्या आईने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायलयाने परराष्ट्र मंत्रालयामार्फत केंद्र सरकारला नोटीस बजावली.