नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जो लॉकडाऊन जाहीर केला आहे तो काहीसा मोठा आहे, असे प्रख्यात राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. इतके दिवस लक्ष्मणरेषेच्या आत अख्खा देश राहिल्यानंतर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी एका ट्विटर संदेशाद्वारे दिला आहे.
Decision to #lockdownindia maybe right but 21 days might a bit too long. But then this is the price one pays for being behind the curve.
With the shaky preparedness to deal with the #CovidCrisis and very little to safeguard the poor, we could be staring at some tough days ahead
— Prashant Kishor (@PrashantKishor) March 25, 2020
करोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सरकारची वैद्यकीय तयारी अत्यंत तोकडी आहे, असेही त्यांनी नमूद केले असून त्यांनी म्हटले आहे की, सरकारने गरिबांच्या हितासाठी पुरेशी काळजी घेतलेली नाही. आपल्याला या 21 दिवसांच्या काळात आणि त्यानंतरही अत्यंत अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.