पुणे -सरकारने शुक्रवारी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाचा पुणे व्यापारी महासंघाकडून विरोध आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयात जनतेचे मत लक्षात न घेता आणि जनतेची सोय न पाहता एकतर्फी निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागणार आहे. या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली आहे.
शहरातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळात संचारबंदीसह विविध निर्बंध आणण्यात आली आहेत. त् केवळ सकाळी 6 ते सायंकाळी 6 दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या निर्णयाला व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे व्यवसाय 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. यापूर्वी महासंघाने पत्रद्वारे रात्री 8 ऐवजी 9 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, निर्णय घेताना महासंघाच्या प्रतिनिधींना बोलवावे, जनतेचे मत लक्षात घ्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, शुक्रवारच्या निर्णयात एकतर्फी निर्णय घेतला आहे,’ असे महासंघाने म्हटले आहे.
अविश्वास दाखविल्याचा केला आरोप; सणांवर परिणाम
विविध भागांत गुढीपाडवा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्यावर्षी पाडवा, अक्षयतृतीयेला लॉकडाऊन होते. त्यामुळे लाखो-करोडोंचे नुकसान झाले. यंदा 13 एप्रिलला पाडवा असून, या निर्णयाने आनंदावर विरजण घातले आहे, असे व्यापारी महासंघाने म्हटले आहे.