नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची कारागृहातून सुटका करण्याचा आदेश दिला आहे. त्या निर्णयावर आम्ही असहमत आहोत अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसने दिली आहे. हा निर्णय चुकीचा आणि दुर्भाग्यपुर्ण आहे असे कॉंग्रेस तर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन जारी करताना पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की देशाच्या भावनेच्या विरोधात हा निर्णय कोर्टाने दिला आहे. आम्ही हा निर्णय अक्ष्यम्य मानतो असेही त्यांनी म्हटले आहे. राजीव हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी आणि तिच्या साथीदारांना कारागृहातून सोडण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. त्यावर कॉंग्रेसची भूमिका काय आहे याला विशेष महत्व आहे, कारण आरोपी नलिनी हिची प्रियांका गांधी यांनी कारागृहात जाऊन काही वर्षांपुर्वी भेट घेतली होती.
राजीव गांधी हत्याकांड में दोषी करार दिए गए नलिनी, रविचंद्रन समेत बाकी लोगों की रिहाई का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया। 30 साल से अधिक समय से जेल में बंद होने को बनाया आधार। इससे पहले कोर्ट ने इस मामले के दोषी पेरारिवलन को भी इसी आधार पर रिहा किया था।
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) November 11, 2022
या हत्या प्रकरणात सात जणांना फाशीची शिक्षा झाली होती. त्यात नलिनीचाही समावेश होता. त्यावेळी सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केल्यानंतर नलिनीची फाशीची शिक्षा रद्द करून तिला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. एस. गवई आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरत्न यांच्या खंडपीठाने राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनी श्रीहर, रॉबर्ट पायस, रविचंद्रन, सुतेंत्र राजा संतान, श्रीहरन मुरुगन आणि जयकुमार यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. हे आरोपी 30 वर्षांहून अधिक काळ कारागृहात होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 तामिळनाडूतील श्रीपेरांबुदूर येथे आत्मघाती स्फोटात हत्या करण्यात आली होती.