मुंबई – महाराष्ट्रातील मॉल्स अँड शॉपिंग सेन्टर्स वगळता इतर सर्व रीटेल उद्योग पुन्हा चालू करण्याच्या निर्णयामुळे इतर रिटेल आस्थापनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र मॉल्स बंदच ठेवण्याच्या आदेशामुळे लाखो कर्मचारी निराश झाले आहेत.
स्टाफ आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत मॉल सर्व मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे (एसओपी) पालन करत आहेत. हे एसओपी इंडियन मेडिकल असोसिएशनने मंजूर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीवर आधारित आहेत.
रीटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले, असा गैरसमज आहे की वातानुकूलित असल्याने मॉलस साथीची परिस्थिती वाढवू शकतात. अशी कोणतीही वैद्यकीय मार्गदर्शक तत्वे किंवा पुरावे नाहीत जे व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एअर कंडिशनरच्या वापरास प्रतिबंध करतात.
मॉल्स आणि शॉपिंग सेंटरस ही महत्त्वाची आर्थिक केंद्रे आहेत. राज्यातील मॉल्स 40,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. आणि जीएसटीमध्ये दरमहा 4,000 कोटी रुपयांचे योगदान देतात. प्रदीर्घ काळ बंद राहिल्याने राज्यातील सुमारे 50 मॉल्समध्ये कार्यरत असलेल्या 2 लाखांहून अधिक लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.