गुवाहाटी – कर्नाटकातील जनतेने भाजपमुक्त दक्षिण भारताची स्थापना केली असून, भाजपमुक्त भारत अभियानाला तेथून सुरुवात झाली आहे. देशातील जनतेला द्वेष किंवा फुटीरतावादी राजकारण नको आहे. त्यांना फक्त शांतता आणि विकास हवा आहे आणि कर्नाटकच्या जनतेने ते दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन आसामचे कॉंग्रेस आमदार अब्दुर रशीद यांनी करतानाच भाजपवर निशाणा साधला आहे.
अब्दुर रशीद म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल हे पुरावे आहेत की लोकांना द्वेष आणि फूट पाडणारे राजकारण नको आहे. आता देशालाच भाजपा डोईजड झाला आहे आणि भाजपमुक्त भारत देशातील जनतेला हवा आहे.
येत्या काही दिवसांत ते प्रत्यक्षात येईल. कर्नाटक निवडणुकीचे निकाल हे द्वेष आणि फुटीरतावादी राजकारणाला लोकांनी नाकारल्याचा पुरावा आहे. तसेच वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपची लाट संपवेल, असे अब्दुर रशीद मंडल म्हणाले.