नियमीत बदलामुळे मोहर गळून पडला
चिंबळी- खेडच्या दक्षिण भागात यंदा दमदार पाऊस कोसळल्याने रब्बी हंगामातील पिके व फळबागांमधून भरघोस उत्तपन मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; मात्र वातावरणातील बदलांमुळे आंबा उत्पदकांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरात कांदा लागवडीसाठी रोपाचा तुटवड जाणवल असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. मात्र, कधी, गारवा, ढगाळ तर मध्येच ऊन या वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर काळपट रोग व चिकटा निर्माण झाला आहे, तर आबांच्या झाडांचा मोहर गळू लागला असल्याने उत्पनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.