बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा तापला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावाने ओळखला जाणारा माळेगाव सहकारी ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. गत निवडणुकीत विरोधी गटाने कारखान्यावर सत्ता प्रस्थापित केल्याने राज्य आणि देशपातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदनामी झाल्याचे अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या सभासदांच्या मेळाव्यात स्पष्ट केले. त्यामुळे यंदा माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवारांनी केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाची धुळ चारून ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे व अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी कारखान्यावर स्वतःचे पॅनल निवडून आले. पाच वर्षांच्या कारभारानंतर पुन्हा एकदा गुरु-शिष्याची जोडी कारखान्याच्या निवडणुकांना सामोरे जात आहे. पाच वर्षांत विस्तार वाढीसह शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्यात आम्ही कसे यशस्वी झालो याचे दाकले चंद्रराव तावरे गटाकडून दिले जात आहेत. तर गरज नसताना विस्तारवाढ करून गुरू-शिष्याच्या जोडीने कारखान्यावर कर्जाचा डोंगर कसा उभा केला आहे.
हे सांगण्यात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मश्गूल आहेत. राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. शरद पवार यांच्या नावाने माळेगाव कारखाना राज्यात आणि देशात ओळखला जातो. चंद्रराव तावरे गटाने दोन वेळेस विजय संपादन करत कारखान्यावर केली. गेल्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीला माळेगाव कारखाना काबीज करायचा आहे. ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने विश्व रचना आखण्यात आले आहे.
तिसऱ्या आघाडीला बरोबर घेऊन गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिसऱ्या आघाडीने देखील राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे चंद्रराव तावरे गटातील नाराजांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीची आगेकूच सुरू आहे. ना राजांमध्ये सुरेश खलाटे यांचा समावेश आहे. शरद पतसंस्थेच्या माध्यमातून अपहार केल्याचा गुन्हा खलाटे यांच्या तक्रारीवरून अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांच्यावर दाखल झाला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने माळेगाव पंचक्रोशीत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खलाटे यांच्या मदतीने राष्ट्रवादीने अशा प्रकारच्या डाव खेळला असल्याचे चित्र निर्माण झाले तशा प्रकारचा अंदाज विरोधी गटाने बांधला. त्याचे पडसाद देखील उमटले पंचक्रोशीत महत्त्वाचे मानले जाणारे मालेगाव पणदरे आणि सांगवी या तीन गावांनी कडकडीत बंद पाळून तावरे गटाचे समर्थन केले. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत राष्ट्रवादी ते फेटाळले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांनी व राजकीय नाट्यमय घडामोडी ने वातावरण ढवळून निघाले.
राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराजीचे प्रमाणदेखील जास्त आहे .नाराज मंडळींची नाराजी दूर करण्याचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर असणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नाराज मंडळींचा चंद्रराव तावरे गटाने अगदी खुबीने फायदा करून घेतला होता. अशा प्रकारचा फायदा उठवण्याचे काम यंदाही होईल यात शंका नाही. मुख्यमंत्री अजित पवार नाराज मंडळींना शांत करून कारखान्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कोणते तंत्र वापरणार याकडे देखील लक्ष लागले आहे.
“गुरु-शिष्या’च्या जोडीपुढे पवारांचा लागणार कस
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर सत्ता प्रस्थापित करून शरद पवार यांना नवीन वर्षाची गिफ्ट देण्याचा त्यांचा मानस आहे. असे असले तरी सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी देखील सहकारात आदर्शवत अशी कारखान्याची वाटचाल सुरू ठेवले आहे. राज्यात उच्चांकी भाव देत सभासदांना देखील भुरळ घातली आहे, त्यामुळे या “गुरू-शिष्या’च्या जोडी पुढे अजित पवारांचा देखील कस लागणार आहे.