नगर – पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने क्रांती घडविण्याची वेळ आहे, असे विचार पहिलवान नानाभाऊ डोंगरे यांनी व्यक्त केले.
किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतिदिनी निमगाव वाघा (ता. नगर) येथील सार्वजनिक व्यायाम शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
सचिन शिंदे, अंकुश शिंदे, बाळू फलके, अनिल डोंगरे, जालिंदर आतकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, विकास निकम, गणेश फलके, अतुल डोंगरे, सोमनाथ आतकर, अरुण कापसे, किरण जाधव आदी यावेळी उपस्थित होते.