नगर -करोना विषाणूने नगर शहरात थैमान घातले आहे. अत्यंत भयानक परिस्थिती नगर शहरात निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जनता कर्फ्यूची नितांत गरज आहे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी व्यक्त केली आहे.
बोज्जा यांनी त्या संदर्भात प्रशसनाकडे विनंती केली आहे. गेल्या दहा दिवसांत शहरात करोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत भयानक स्वरूपात वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी कोणत्याच रुग्णालयात आता जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे.
उपचाराविणाच रुग्ण दगावण्याची भीती खूप वाढली आहे. जनतेची जबाबदारी जास्त वाढली आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करीत नाहीत, हेच स्पष्टपणे दिसते. तथापि, या नियमांचे पालन होत नसल्याचे स्थिती खूप हाताबाहेर जात आहेत. परिणामी नगरमध्ये जनता कर्फ्यूचाच पर्याय योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.