कापूरहोळ (वार्ताहर) – पुणे – सातारा महामार्गाच्या समस्या आणि खेडशिवापूर टोलनाका बंद करण्यासाठी जनतेतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याबाबत एनएचआयला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्र दिल्याने खेडशिवापूर टोलनाका बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती खेडशिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने दिली.
यावेळी आमदार संग्राम थोपटे, ज्ञानेश्वर दारवटकर, दिलीप बाठे, डॉ. संजय जगताप, रोहन बाठे, विलास बोरगे, जीवन कोंडे, राजेंद्र कोंडे, अमर बुद्गुडे, गोरख मानकर, विजय वाकडे, विश्वास ननावरे उपस्थित होते.