मुंबई – ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स जारी केले आहेत. या समन्सद्वारे त्यांना 23 ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे समन्स 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी बजावण्यात आले.
दरम्यान, रवींद्र वायकर यांनी आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचे समन्स आले नसल्याचे म्हटले आहे. तसेच जर समन्स आल्यास चौकशीला हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांनी आधीच कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी देखील काही आरोपी आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.