हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातून एका अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. या अपघातात चार जनांसह तब्बल १९० मेंढयांना आपले प्राण गमवावे लागल्याचे समजते. याशिवाय दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मेंढ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने गाडीनं उभ्या असलेल्या चार चाकी वाहनाला धडक दिल्याने हा अपघत घडला. धडक बसलेल वाहन फरशीने भरलेलं होत. त्यामुळे हा अपघात आणखी भीषण ठरला. अपघातानंतर मेंढ्या नेणाऱ्या गाडीचा चक्काचूर झाला होता. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
सलमान अली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीर मेवाती, आलम आली अशी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार राजस्थानवरून हैद्राबादकडे कंटेनरने मेंढ्या नेण्यात येत होत्या. गुरुवारी (२५ मे) पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास माळेगाव फाट्याजवळ चालकाला डुलकी आली त्यामुळे वाहनावरचा त्याचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला.
अपघाताची भीषणता इतकी होती कि अपघातात तिघे जण जागीच ठार झाले. तर जखमी झालेल्यांना नांदेडला उपचारासाठी नेत असताना एकाच मृत्यू झाला. दुर्दैवाने अपघातात १९० मुक्या प्राण्यांना देखील आपले प्राण गमवावे लागले. अपघातातील सर्व मृतक परराज्यातील असल्याचे स्पष्ट झाले.