हैदराबाद/रांची – तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी आज झारखंडमधील रांची येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेली तयारी आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि राजीव आरोग्यश्रीची मर्यादा ५ लाखांवरून १५ लाख रुपयांपर्यंत वाढवणे या दोन हमींच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी काँग्रेस नेत्यांना यावेळी माहिती दिली.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना लोकसभा निवडणुकीत तेलंगणातून निवडणूक लढवण्याची विनंतीही त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली.मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का आणि राज्यमंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी हेही या यात्रेत सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांची ही यात्रा झारखंड मध्ये प्रवेश करण्यापुर्वीच या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या चंपाई सोरेन सरकारला विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागले आहे.
या घडामोडींवर टीका करताना कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, राज्यात आदिवासी मुख्यमंत्री आहे हे भाजपला सहन होत नाही.पण झारखंडने विश्वास दर्शक ठराव मंजुर करून भाजपला धडा शिकवला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.