चेन्नई : गेले काही दिवस सुरू असणाऱ्या पावसामूळे संरक्षण भींत कोसळून 17 जण मरण पावले. मृतांत 10 महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. ही घटना कोइमतूरपासून 50 किमी अंतरावरील नादूर या गावात घडली.
पाहटे पाचच्या सुमारास सारे झोपेत असतानाच ही दूर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्व मृतदेह बाहेर काढले. बचाव कार्य अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान राज्य आपत्कालीन मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी जाहीर केली आहे.
कोइमतूरचे जिल्हाधिकारी के. राजमणी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सुजित कुमार यांनी घटनास्थळाची पहाणी केली. येत्या काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता तसेच 50 ते 60 प्रतितास वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.