शिराळा – डेंग्यू रुग्णांसह इतर नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या आरोग्य विभागाने डेंग्यू बाबत तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले आहे.
बहादूरवाडी, ता. वाळवा येथे पसरलेल्या डेंग्यू साथीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची विचारपूस त्यांनी केले.
यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आ. नाईक म्हणाले, डेंग्यूबाबात सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. प्राथमिक अवस्थेतच डेंग्यूची लक्षणे दिसता क्षणी उपचार घ्यावेत. आरोग्य विभागाने उपचाराबाबत कोणताही हालगर्जीपणा करु नये. तातडीने योग्य उपचार देवून सर्वोतोपरी रुग्णांना बरे करावे. रुग्णांच्या संख्येत वाढ होणार नाही, याची काळजी घ्यावी.
आमदार नाईक यांनी डॉ. सुनील खोत व डॉ. सी. बी. पाटील यांच्या खासगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या तसेच शासकीय रुग्णालयातील डेंग्यूने आजारी रुग्णांची भेट घेवून विचारपूस केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकिय अधिकारी डॉ. दीलीप पाटील, उपकेंद्राच्या सौ. हराळे यांच्याकडून रुग्णांची माहिती घेतली.
रुग्ण वाढू नयेत, यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत आढावा घेवून सूचना दिल्या. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव बेनाडे, माजी सरपंच विलासराव देसावळे, बाजीराव जाधव, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्रामसिंग घोरपडे, सोसायटी अध्यक्ष भीमराव देसावळे, उपाध्यक्ष पोपट माने, संजय देसावळे, दूध संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवाजी जाधव, विठ्ठल पाटील, बाळासो गोसावी, दिलावर महाब्री, निवृत्ती पाटील, अनिल माने, दत्तात्रय कोळी, शुभम घोरपडे, मंगेश माने, बाळासो पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.