नगर -ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास जातीचे अनेक प्रश्न वर्षोनवर्ष प्रलंबित आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या एम.पी.एस.सी. व अन्य सर्व प्रकारच्या परीक्षा कुणाच्याही दबावाची पर्वा न करता ताबडतोब घेण्यात याव्यात. तसेच 11 वी ची प्रवेश प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात यावी. शासकीय सेवांमधील ओबीसीचा अनुशेष लवकरात लवकर भरण्यात यावा. कोणत्याही कारणास्तव मेगाभरती न थांबवता ती ताबडतोब करण्यात यावी, अशी मागणी राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलकांनी केली.
मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टात स्थगिती मिळाल्यामुळे काही मराठा समाजाचे नेते व संघटना जाहिरपणे ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मागणी करीत आहे. त्यामुळे ओबीसी व भटके विमुक्त समाजात संतापाची लाट उसळली असल्यामुळे ओबीसी व भटक्या समाजाचे जो पर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत जिल्हाअधिकारी व तहसिल कार्यालयावर आंदोलन राहणार असल्याचे माहिती जय भगवान महासंघाचे अध्यक्ष रमेश सानप यांनी म्हटले.
यावेळी आनंद लहामगे, संजय आव्हाड, मदन पालवे, अमोल ढापसे, आशा पालवे, अलकनंदा पालवे, शशिकांत सोनवणे, जितेंद्र ढापसे, शरद मुर्तडकर, सुधाकर साबळे, महेश शिरसाठ, तुकाराम पालवे, आकाश खर्पे, सुभाष निंबाळकर, सुनिता पालवे, बाबासाहेब गर्जे, डॉ. श्रीकांत चेमटे आदी उपस्थित होते.