कोलकाता – बांगलादेशात दुर्गापुजा मंडपांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या प्रकरणी पश्चिम बंगालमधील अनेक क्षेत्रातील नामवंतांनी बांगलादेश सरकारला या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करा असे आवाहन केले आहे.
त्यात लेखक, अभिनेते, दिग्दिर्शक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या सर्वांनी एक संयुक्त पत्र बांगलादेश सरकारला लिहीले आहे. त्यात 60 जणांच्या सह्या आहेत. त्यात नमूद करण्यात आले आहे की बांगलादेशातील हिंदु समाजाला त्यांच्या इच्छेनुसार तेथे दुर्गा पुजेचा उत्सव साजरा करता येईनासा झाला आहे.
अशा पुजांच्या मंडपांवर अनेक ठिकाणी हल्ला व हिंसाचार झाला आहे. मानवतेला काळे फासणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या आहेत. त्यातून तेथील सामाजिक सलोखा बिघडला आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांना त्यांच्या धार्मिक प्रथापरंपरा पाळण्यास आडकाठी येणार नाहीं याची काळजी सरकारनेच घेतली पाहिजे असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये शिक्षण तज्ज्ञ पवित्र सरकार, मार्कसवादी पॉलिट बुयरो सदस्य महंमद सलिम, कोलकाताचे माजी महापौर बिकास भट्टाचार्य, रंगकर्मी देव शंकर हलदर, लेखक नवकुमार बसु, कौशिक सेन, चित्रपट निर्माते कमलेश्वर मुखोपाध्याय, अभिनेते परमव्रत चॅटर्जी, रिद्दी सेन, रित्वीक चक्रवर्ती, अदिंच्या सह्या आहेत.