ऍडलेड – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारताला इंगलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. याचे उलट सुलट पडसाद आता उमटत आहेत. या पराभवामुळे आयसीसी तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला तोटा झालाच आहे परंतू त्यांच्या देशात अधिकृत असलेल्या सट्टेबाजालाही फटका बसला आहे. सट्टेबाजांचे तब्बल 500 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर मोठी बोली लावणाऱ्या सट्टेबाजांना हा तोटा झाल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे. सट्टेबाजांनी भारत व इंग्लंड यांच्यातील उपांत्य लढतीत 13 व्या षटकापासून सट्टा लावणे बंद केले.
त्यावेळी इंग्लंडने बिनबाद 140 धावा केल्या होत्या. हा सामना सुरू झाला तेव्हा इंग्लंडचाच विजय होणार असे कोणालाही वाटले नव्हते. त्यामुळे सामन्यापूर्वी भारतावर 82 पैसे तर इंग्लंडवर 1.10 रुपये सट्टा लागला होता.
मात्र 13 व्या षटकातील स्थितीमुळे भारतला 15 रूपये तर इंग्लंड 1 पैसे हा भाव होता. इंग्लंडचा संघ विजयाच्या मार्गावर असतानाही भारत सामनचे चित्र बदलेल हीच आशा ठेवत भारतावर पैसे लावले गेले. सट्टेबाज सुरूवातीपासूनच भारतावर दावा लावत होते. मात्र इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यावर व ते विजयाच्या मार्गावर आल्यावर सट्टेबाजांनी सट्टा लावणे बंद केले.