मेलबर्न – इंग्लंडकडून पराभूत झाल्यावर केवळ भारतीय संघालाच फटका बसला असे नाही तर आयसीसीचेही नुकसान झाले आहे. विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी ज्या दरांची तिकिटे ठेवली गेली होती त्यात तब्बल 60 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आयसीसी, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ यांना करोडो रुपयांचा तोटा होणार आहे.
अंतिम सामना उद्या (रविवार) इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा रविवारचा दिलस असल्याने मूळ वेळापत्रक तयार रताना आयसीसीने भारत व पाकिस्तान सामना होण्याच्या अपेक्षेने तिकिटांचे दर वाढवले होते. उपांत्य लढतीतच भारताचा पराभव झाल्याने हे दर कमी करण्यात आले आहेत.
व्हीआयपी तसेच गॅलरीच्या तिकिटाचा दर भारतीय रुपयांत तब्बल 24 हजार चारशे रुपये होता जो आता 18 हजार रुपये ठेवण्यात आला आहे. लहान मुलांच्या तिकिटांचा दरही कमी करावा लागला आहे. आयसीसीसह जाहिरात कंपन्या, आयसीसीचे भागीदार, ब्रॉडकास्टर यांनाही आता मोठा फटका बसला आहे.
Meta Layoffs : चांगली नोकरी सोडून Meta जॉईन केले, मात्र दोनच दिवसात कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता
…तर विजेतेपद विभागून देणार
इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात रविवारी होत असलेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत जर सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना विजेतेपद विभागून देण्यात येइल, असे आयसीसीने म्हटले आहे. गेले दोन दिवस मेलबर्नमध्ये पाऊस पडत होता. रविवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.