10,000+ प्रशासकीय अधिकारी चळवळ
दहावी वी 12 वी नंतर पुढे काय? कोणतं करिअर निवडलं पाहिजे? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो असा प्रश्न मलाही पडला होता. त्याचे उत्तर शोधण्यसाठी व योग्य करिअरची निवड करता यावी व सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचता यावे यासाठी 14 ऑक्टोबर 2014 साली राजगुरूनगर, पुणे येथे स्वामी विवेकानंद अकॅडमीची स्थापना करण्यात आली.
स्थापना करतेवेळी डोळ्यासमोर केंद्रबिंदू होता 10 वी 12 वी विद्यार्थी वर्ग. या प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली तर कमी कालावधीमध्ये योग्य मार्गदर्शन असेल तर ध्येयापर्यंत पोहचता येऊ शकते ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणे आवश्यक असते. तसे पाहिले तर प्रत्येकाला वाटतं मला सरकारी नोकरी पाहिजे, पोलीस प्रशासनात मानाचं पद असलं पाहिजे. समाजामध्ये मानसन्मान असला पाहिजे, परंतु त्यासाठी फक्त इच्छा असून काही होणार नाही तर गरज असते. ध्येय ठरवून त्यावर ठाम राहून त्याचे योग्य नियोजन करण्याची व एक-एक पाऊल ध्येयाकडे टाकण्याची त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक “प्लॅटफॉर्म’ हवा असतो. तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे स्वामी विवेकानंद अकॅडमीची स्थापना होय. तसं पाहिलं तर स्थापनेचा सुरुवातीचा प्रवास खूप कठीण होता कारण त्यासाठी भांडवलाची गरज होती. फक्त ज्ञान असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असून चालत नाही गरज असते गुंतवणूक करण्याची रिस्क (जोखीम) पत्करण्याची. गरज असते प्रवासाला सुरुवात करण्याची. एकदा सुरुवात केली तर न थांबता न थकता सातत्याने, प्रामाणिकपणे कष्ट करून आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करून कठीण परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची. अनेक प्रश्न आमच्यासमोर होते; परंतु ध्येय निश्चित होते, विश्वास होता स्वतःवर की आपण हे कार्य करतोय ते समाजाच्या हिताचे आहे. त्यासाठी अगोदर आपण आपल्या ध्येयावर ठाम राहिले पाहिजे. अडचणी येणार हे ग्राह्य धरून त्यावर मात करून काहीही गमवावे लागले तरी चालेल; परंतु स्वामी विवेकानंद अकॅडमी सुरू करणारच असा दृढ निश्चय केला. सुरुवातीला मी व माझा मित्र नवनाथ सावंत (सध्या मुंबई जेल पोलीस येथे कार्यरत) दोघांनी मिळून सुनिल धंद्रेसाहेब यांच्या सहकार्याने त्यांच्याच कार्यालयामध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमीची स्थापना केली. त्यासमोरच एक प्रथमेश कोचींग क्लास होता. तो नाममात्र भाडेतत्त्वावर घेऊन 4 विद्यार्थ्यांवर सुरुवात केली.
कैलासभाऊ केदारी जे आज संस्थेवर कोषाध्यक्ष आहेत यांच्या श्रीश्री फ्लेक्स प्रिंटर्सकडून अवघ्या 700 रुपये ऍडव्हान्स देऊन अकॅडमीची जाहिरात दिली. फ्लेक्स छापले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा घेतला. 100 ते 150 विद्यार्थी त्यासाठी उपस्थित राहिले; परंतु लगेच कोणीही प्रवेश घेतला नाही. कारण आमच्याकडे दाखविण्यासाठी रिझल्ट नव्हता. आजच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला तो प्रश्न असतोच व का असू नये, कारण आपलं भविष्य त्या ठिकाणी घडणार असते. म्हणून आम्ही निश्चय केला जो आपल्यावर प्रथम विश्वास ठेवून येईल त्यांना त्यांच्या ध्येयावर पोहोचवायचे म्हणजे आपल्याकडे आपोआप इतर विद्यार्थी येतील. म्हणून आम्ही स्वतः आभारी आहोत की विशाल डोंगरे सर (मुंबई विक्रीकर निरीक्षक मुंबई) व कृष्णा घाडगे सर (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भोसरी) यांचे कारण त्यांनी आम्हाला विश्वास दिला की, तुम्ही करू शकता तुमच्या शिकवण्यामध्ये ते टॅलेंट आहे. ती गुणवत्ता आहे. मेळावा घेऊन 13 दिवस एकही प्रवेश झाला नाही निराशा येणे साहजिकच होते. कारण आणखीन काही जाहिरात उधारीवर केली होती. मेळाव्याचा खर्च झाला होता. 13व्या दिवशी एकदम 4 प्रवेश झाले. त्यांना प्रथम डेमो लेक्चर दिले. त्यांनी इतरांना सांगितले. शिकवण्याची पद्धत व तळमळ त्यांना आवडली व जे प्रथम विश्वास ठेवून आले. त्यामध्ये प्रथम मुंबई पोलीस प्रशांत नाईकरे, संगिता शेवाळे, ज्योती गोगावले, पूजा जाधव, विवेक आरगडे, संतोष वाळुंज व इतर अशा 10 विद्यार्थ्यांना 2016च्या बॅचमध्ये यशस्वी करून दाखविले. आता आमच्याकडे दाखविण्यासाठी रिझल्ट होता. नवनाथ सावंत यांचे मुंबई जेल पोलीसला सिलेक्शन झाले. त्यामुळे सर्व भार माझ्यावरती आला; परंतु खचून न जाता भैय्यासाहेब भागवत, दशरथ डोलारे, दिपक ढमाले, आनंद तनपुरे, दिपक चव्हाण, रोहिणी नवले मॅडम व कोषाध्यक्ष कैलासभाऊ केदारी तसेच संपत गारगोटे, कैलास दुधाळे, रज्जाकभाई शेख, अनिलजी बारणे, उत्तम राक्षे, हरेशभाई देखणे, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सुनिल बांगरसाहेब व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी यांच्या समवेत यशस्वी घोडदौड सुरू केली.
ज्या विद्यार्थ्यांना सर्व काही असतं ते विद्यार्थी कारण देतात व आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतात. परंतु, आपल्या परिस्थितीला दुसरं कोणीही जबाबदार नसतं तर त्याला आपण स्वतः जबाबदार असतो. त्यामुळे स्वतःची जबाबदारी ओळखून योग्य मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यास कोणीही यशस्वी होऊ शकतो असा आत्मविश्वास ऍकॅडमीमार्फत सर्व विद्यार्थ्यांना दिला. दुसरं म्हणजे अकॅडमीमध्येच राहून ज्यांनी अभ्यास केला व सध्या मुंबई पोलीस असलेले दिपक ढमाले, स्वतः काम करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही पडेल ते काम करण्याची तयारी दाखवून परिस्थितीला नमवून यशस्वी झाले. निवृत्त आर्मी रविंद्र साळुंखे वर्ग-2 चे अधिकारी (रेल्वे स्टेशन मॅनेजर भुसावळ येथे कार्यरत) झाले. असे 500हून जास्त अधिकारी प्रशासनामध्ये कार्यरत आहे.
अकॅडमीच्या या विद्यार्थ्यांचे अनुभव लक्षवेधी
पोलीस उपनिरीक्षक अनिता चोरघे
जेव्हा मी स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला अशा स्पर्धा परीक्षांबद्दल फारशी माहिती नव्हती. “एमपीएससी’चा फुलफॉर्मसुद्धा माहिती नव्हता. मनात भीती होती, “आपण खरंच यशस्वी होऊ का?’ स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र शिंदे यांनी मला विश्वास दिला की, “कठोर परिश्रम व योग्य मार्गदर्शन असेल तर व अभ्यासाचे योग्य नियोजन! सातत्य!! चिकाटी व यश!! या संस्थेच्या ब्रीद वाक्यानुसार तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहचणारच!’ सरांनी माझ्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत केला. कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा? वेळेचे नियाजेन करून राज्यसेवा कशी उत्तीर्ण करायाची याचा राजमार्ग सरांनी सांगितला. पाईट नावाच्या गावापासून 3.5 कि.मी. अंतरावर असलेल्या चोरघेवाडी या छोटाशा खेडेगावातील मी मुलगी. पाईटवरून सकाळी सहा वाजताची बस पकडण्यासाठी त्या चोरघेवाडीवरून पाईटला दररोज 3.5 कि.मी. चालत यायची. नंतर 8.30 वाजता अकॅडमीमध्ये लेक्चरला बसून दोन वाजेपर्यंत लेक्चर्स व त्यानंतर अभ्यास करून 5 वाजता घरी जात. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करत व नंतर परत पहाटे 4 वाजता उठून चालत प्रवास! फक्त चार तास झोप घेत असे. कारण माझ्या डोळ्यासमोर फक्त वर्दी दिसायची, झोप लागायची नाही. जोपर्यंत आपण डीवायएसपी होत नाही, तोपर्यंत अभ्यास संपणार नाही, असे मनाशी ठरवले. कारण… “कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती’.
सोमनाथ होले, पुणे शहर पोलीस
स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये मी मैदानी व लेखी परीक्षेचा दोन वर्षे अभ्यास केला व 2018 साली पुणे शहर पोलीस म्हणून नियुक्त झालो. हे यश माझ्यासाठी खूप महत्वाचे ठरले. कारण माझ्या आई-वडिलांची व गावाची, मित्रांची व स्वामी विवेकानंद अकॅडमीची मान व शान राखण्यात मी यशस्वी झालो. वर्ष 2017 मध्ये मला थोडक्यात अपयश आले. थोडे दिवस खूप निराशेत गेले. स्वामी विवेकानंद जवळपास सर्व अकॅडमीतील मित्र पोलीस दलात व प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते; मात्र सर्व शिक्षकांनी मला आत्मविश्वास दिला की, तू करू शकतोस. त्यांच्यामुळेच मी स्वत:ला सावरले व पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो. दिवसरात्र फक्त वर्दी असलेली स्वप्नं पडत. कारण सातत्याने फक्त वर्दी व वर्दीचाच विचार करून अभ्यास व मैदानी सराव मी करीत असे. अकॅडमीमध्ये प्रत्येक लेखी परीक्षा व मैदानी डेमो कधीच चुकवला नाही. दर आठवडयाला किमान पाच प्रश्नपत्रिका मी सोडवत असे. दर्जेदार पुस्तकांचा व सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकांचा जास्तीत जास्त सराव करत व फक्त स्वत:शी स्पर्धा करत यश मिळवले. “जर मी स्वत:ला जिंकले तरच मी जग जिंकू शकतो व यश मिळवू शकतो,’ असे मला वाटे. त्यासाठी झपाटून नियोजनपूर्वक अभ्यास केला व आज पुणे शहर पोलिसात दाखल झालो. आता इथेच न थांबता आता पीएसआयची मी तयारी करत आहे. स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच आपण पीएसआय होऊ, असा विश्वास मला आहे.
अजित पवार, पुणे ग्रामीण पोलीस
माझी लहानपणापासूनच पोलीस बनण्याची इच्छा होती. त्यासाठी मी स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. शिंदे सरांनी मला अकॅडमीमध्ये प्रवेश घेताना यशाची 100 टक्के हमी दिली. त्यादृटीने योग्य मार्गदर्शन केले. अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे. तुम्हाला एक प्रकारची वातावरण निर्मिती मिळते. स्वतःतील कमतरता व चुका कळतात. जास्तीत जास्त सराव पेपर अकॅडमीमध्ये होत असल्याने व मैदानी परीक्षा कठीण होत असल्याने आम्हाला आमच्या उणीवा समजल्या. भरतीच्या वेळेस आत्मविश्वास वाढला. 24 तास अकॅडमी सुरू असल्याने व डिजीटल क्लासरुम असल्याने शॉर्टकट व सोप्या पद्धतीने वैज्ञानिक विचारधारा प्रगत होऊन मी यशस्वी होऊ शकलो. सरांच्या 1000 प्लस प्रशासकीय अधिकारी चळवळीला शुभेच्छा!
दीपक ढमाले, मुंबई पोलीस
माझी घरची परिस्थिती खूप बिकट होती. प्रथम स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये चौकशी केली, त्यावेळी मला फी भरणेही शक्य नव्हते व राहण्याचीही व्यवस्था नव्हती. सरांनी फी माफ तर केलीच; तसेच राहण्याचीही विनामूल्य व्यवस्था अकॅडमीमध्येच केली. अकॅडमीमध्ये संपूर्ण क्लास हा डिजीटल व सर्व ठिकाणी वेगवेगळे शॉर्टकट मेथडस्चे फलक लावले आहेत. ते मी दररोज रात्री झोपताना पाठ करत असे. त्याचा फायदा असा झाला की, माझा अभ्यासाचा पाया पक्का झाला. स्वामी विवेकानंद अकॅडमी ही एकमेव अशी अकॅडमी आहे की, जी 24 तास अभ्यासासाठी सुरु असते. गरीब कोणताही विद्यार्थी ज्याच्याकडे कष्ट करण्याची व ध्येय प्राप्त करण्याची तयारी आहे, त्याला सुरेंद्र शिंदे सर मदत करायला तत्पर असतात. मीदेखील प्रत्येक शिक्षकाने सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करत असे. अगोदर मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा प्रत्येकी 100 गुणांची अशी एकूण 200 गुणांपैकी निवड होत असे. मला 200 पैकी 191 गुण मिळाले व 5 व्या क्रमांकाला नाव आले. जेव्हा रिझल्ट आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी सरळ शिंदे सरांना भेटलो. त्यावेळी माझ्या डोळ्यांत पाणी होते. केलेल्या कष्टाचे चीज झाले होते. शिंदे सरांनी व स्वामी विवेकानंद अकॅडमीतील सर्व शिक्षकांनी जर मला सहकार्य केले नसते तर आज मला ही पोलीस वर्दी मिळाली नसती.’
रूपाली शिंदे, मुंबई लोहमार्ग पोलीस
माझे आई-वडील शेतकरी असल्याने घरची परिस्थिती हलाखीची होती. हुतात्मा राजगुरु विद्यालय, राजगुरुनगर येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वामी विवेकानंद अकॅडमीचे नाव कोणीतरी सुचवले आणि मी अकॅडमीत दाखल झाले. प्रा. सुरेंद्र शिंदे यांची ही संस्थाच माझ्या जीवनाला दिशा देणारी संस्था ठरली. मग पोलीस भरती प्रशिक्षण आणि त्यादृष्टीने घेतलेले कठोर परिश्रम यामुळे आपणही जीवनात कुणीतरी बनू शकतो, हा आत्मविश्वास आला. वर्ष 2017 मध्ये राज्यात पोलीस भरती होणार असल्याची जाहिरात आली आणि या परीक्षेत मला यश मिळाले. एक काळ जीवनात आपण नक्की कोण बनणार, याचाही काही अंदाज नसलेल्या माझ्यासारख्या मुलीला स्वामी विवेकानंद अकॅडमीमुळेच राज्य पोलीस दलात सेवेची संधी मिळाली. कष्ट, अव्याहत अभ्यास आणि सातत्याने प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवता आले.
दिपक नाईकरे, पुणे शहर पोलीस
मी स्वामी विविेकानंद अकॅडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. येथूनच मला माझ्या यशाचा राजमार्ग सापडला. अकॅडमीमध्ये शिंदेसरांनी खूप चांगल्या प्रकारे सर्व इतिहास, भूगोल, जनरल नॉलेज, ट्रिक्स सांगितल्या. येथे चांगल्या प्रकारे अभ्यास करवून घेतला जातो. तसेच रात्रीही अभ्यासाची सोय आहे. सरदेखील रात्री अभ्यास घेताना मागदर्शन करतात. शेवटी मला एकच सांगायचे आहे की, मी या अकॅडमीतील सर्व शिक्षकांचा सदैव ऋणी राहील. त्यांनी मला योग्य मार्गर्दन केले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे माजी सैनिक या प्रवर्गामध्ये पुणे शहर 2017मध्ये प्रथम आलो.
सद्यस्थितीत अकॅडमी प्रशिक्षण
पअवघ्या चार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेमध्ये आज वर्षभरात 400 ते 500 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात व दरवर्षी 100 ते 150 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल होतात.
प संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात. मैदानी सराव सकाळी 7.30 ते 9.30 क्रीडा संकुल मैदान राजगुरूनगर येथे होतो. तसेच प्रशिक्षण वर्ग हे सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असतात.
पअकॅडमीच्या माध्यमातून प्रत्येक शाळा, महाविद्यालये या ठिकाणी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विश्वाबद्दल जास्तीत जास्त माहिती देणे त्यांना या स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये सहभागी करून घेणे व जोपर्यंत विद्यार्थी सरकारी सेवेत प्रशासनात यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याला अकॅडमीमार्फत योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी एकदा फी भरल्यानंतर यशस्वी होईपर्यंत कोणतीही फी आकारली जात नाही
पगरीब व होतकरू विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी आकाली जाते. व सर्वांना लाइफटाईम प्रवेश दिला जातो. एकदाच प्रवेश घ्यायचा व जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही. तोपर्यंत सर्व स्टाफ व अकॅडमी आपल्याला मार्गदर्शन करीत राहील.
संकलन: सुनील थिगळे
दावडी, ता. खेड