supriya sule : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. मात्र सरकारला पुन्हा २ महिन्याची मुदत देत उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “आता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोर जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांची मुदत देत मोठेपणा दाखविला आहे. राज्यातील तिघाडी सरकार मात्र तारखांचा घोळ करण्यात व्यस्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती या तिघाडी सरकारमध्ये आहे का?, हा खरा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी,”उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी होते. आरोग्याच्या बाबतीत राजकारण करू नये. त्यांच्या तब्बेतीची चैकशी करत आहे, असे सांगत त्यांनी अजित पवार यांचा आजार राजकीय नव्हता, हे स्पष्ट केले.
पुण्यातील चांदणी चौकातील संपूर्ण प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही सुळे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईंनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना कोणत्या आईला तसे वाटणार नाही, असे सुळे यांनी सांगितले.
सुळे म्हणाल्या की, पाच महिन्यांपूर्वी कांदा प्रश्न पेटणार असल्याचे सांगितले होते. वाणिज्य मंत्री पियुष गोएल यांनी त्याची दखल घेतली नाही. कांद्यावर चाळीस टक्क्यांचा कर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार शेतकरी आणि महिला विरोधी आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासासाठी त्यांनी मोठेपणा देत सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. राज्यातील सरकार मात्र तारखांचा घोळ करून फसवणूक करत आहे. आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का, हा मूळ प्रश्न आहे. इच्छाशक्ती असेल तर ते आरक्षण देतील, असे सुळे यांनी स्पष्ट केले.