Supriya Sule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षात जागेवरून चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने प्रमुख प्रकाश यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
बारामती याठिकाणी माध्यमांशी साधत असताना सुप्रिया सुळे यांनी, “आमची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. आम्ही जागावाटपावर सविस्तर चर्चा करु. तुम्हाला आठ ते दहा दिवसांत समजेल कोणाला किती जागा मिळणार” असे म्हटले. तसेच पुढे बोलताना “राम हा आस्थेचा विषय आहे. जगभरात रामाचे भक्त आहेत. मात्र, आम्ही राम कृष्ण हरी वाले आहोत”, असेही म्हणत सुप्रिया सुळे यांनीही राम मंदिराबाबत भाष्य केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांचे कौतुक केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे, “केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे 40 वर्षांपासून चांगले संबंध आहेत. गडकरी यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्यातील भेटीवर,” बच्चू कडू यांनी बंद दाराआड चर्चा केली असेल तर मला याबाबत काही माहिती नाही. आम्ही पुढील रणनिती अपात्रेबाबतचा निर्णय आल्यानंतर ठरवणार आहोत,” असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावरून सुप्रिया सुळे यांनी ,”अतिथी देवो भव त्यांचे आम्ही स्वागत करु. नाशिकमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्यापर्यंत पोहोचेल.” कांद्या निर्णयाबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांनी कांदा निर्यातीबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे. पीएम मोदींनी कांदा निर्यातीवरिल बंदी उठवावी, अशी मागणीही सुळे यांनी यावेळी केली. शिवाय, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला.