PAK vs IRE 3rd T20I : बाबर आझमने रचला इतिहास, विराट कोहलीला मागे टाकून केला विश्वविक्रम…

PAK vs IRE 3rd T20I Match Highlights : पाकिस्तानने आयर्लंडविरुद्धची तिसरी टी-20 मालिका जिंकली. डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझमने पाकिस्तानसाठी 42 चेंडूत 75 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या खेळीने बाबरने विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची अनेकदा भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीशी तुलना केली जाते. दोघेही एकाच शैलीचे फलंदाज आहेत. विराट कोहली जसा टीम इंडियासाठी विक्रमांमागून विक्रम करत आहे, तसाच दर्जा पाकिस्तानसाठी बाबर आझमचा आहे. आयर्लंडविरूध्दच्या मालिकेत बाबर आझमने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
Pakistan win the final T20I by six wickets ✅@babarazam258 and @iMRizwanPak boss the chase with a stellar batting display 👏#IREvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/Kcf6x09peF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 14, 2024
खरं तर, बाबर आझम हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ (पन्नास पेक्षा अधिक) धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माला खूप मागे सोडले आहे. विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा पन्नास प्लस (50+) धावांची इनिंग खेळली आहे, तर बाबर आझमने 39व्यांदा ही कामगिरी केली आहे. रोहित शर्माने आतापर्यंत केवळ 34 वेळा T20I सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्यात यश मिळवले आहे.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 50+ चा सर्वोच्च धावा करणारे फलंदाज…
बाबर आझम- 39 (36 अर्धशतक आणि 3 शतक)
विराट कोहली- 38 (37 अर्धशतक आणि 1 शतक)
रोहित शर्मा- 34 (29 अर्धशतक आणि 5 शतक)
मोहम्मद रिझवान- 29 (28 अर्धशतक आणि 1 शतक)
डेव्हिड वॉर्नर – 27 (26 अर्धशतक आणि 1 शतक)
उजव्या हाताचा फलंदाज बाबर आझमने मंगळवारी, 14 मे रोजी T20I क्रिकेटमधील 36 वे अर्धशतक झळकावले. त्याने आयर्लंडविरुद्ध दमदार खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. बाबर आझमने 36 अर्धशतकांसह 3 शतकेही झळकावली आहेत. अशा प्रकारे तो पन्नास पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेला आहे.
The captain is putting on a show 🔥
Babar Azam scores his 36th T20I fifty ✨#IREvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/fZqrTLDadk
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 14, 2024
विराट ‘या’ बाबतीत अजूनही पहिल्या क्रमांकावर
मात्र तरीही विराट कोहलीच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके आहेत. त्याने T20I क्रिकेटमध्ये 37 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याच्या बॅटमधून एक शतक झळकले आहे. अशाप्रकारे तो 38 वेळा पन्नास प्लस धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. रोहित शर्माने आत्तापर्यंत 5 शतके आणि 29 अर्धशतके झळकावली आहेत, तर मोहम्मद रिझवानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघासाठी एक शतक आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत.
पाकिस्तानने अशाप्रकारे तिसऱ्या सामन्यासह जिंकली मालिका….
डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 178 धावा केल्या. कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज लॉर्कन टकरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 41 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना 17 षटकांत 4 बाद 181 धावा करताना विजय मिळवला. संघाकडून कर्णधार आझमने सर्वाधिक 75 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने 38 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावा केल्या. बाबर आणि रिझवान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 139 (74) धावांची भागीदारी केली.





