Supriya Sule on Jayant Patil। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात पक्ष बदलाचे वारे वाहताना दिसून येतंय. तशाच काही चर्चा राज्यातही होताना दिसतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन गट निर्माण झालेत. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सदून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे देखील भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटलं जातंय. याच चर्चांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ३ सोलीत भाजपला सुनावले.
सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका Supriya Sule on Jayant Patil।
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपसोबत जाणारअसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. 100 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडेचे लोकं त्यांना हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, “असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नेत्यांच्या पक्षांतरावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
उन्हाळा वाढत चालला आहे. 8 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने यूपीआय विरोधात व्हाईट पेपर काढले. निशिकांत दुबे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आरोप केले की आदर्श घोटाळ्यात काही गोष्टी आहेत. आदर्श घोटाळा अशोक चव्हाण यांनी केला मी नाही बोलत पण हे भाजप बोलते. भाजपचे भ्रष्टाचार जुम्ला पार्टी हे मॉडेल तयार झालं आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपमध्ये जातो, असं म्हणत महाविकास आघाडीसोडून महायुतीत जाण्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्रालयाचे ऑडिट करा Supriya Sule on Jayant Patil।
कायदा आणि सुव्यवस्था बद्दल पण मी अनेक वेळा बोलली आहे. मी अमित शाह यांच्याशी सुद्धा सांगितलं आहे. पुणे नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांना विनंती की गृहमंत्रालयाचे ऑडिट करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.