पुणे – बंगालच्या उपसागरातील पूर्व-मध्य भागात मंगळवारी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. यामुळे मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली असून मान्सून आता गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यास पोषक स्थिती आहे, असे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हे कमी दाबाचे क्षेत्र मान्सून वाटचालीस पूरक ठरण्याचे संकेत आहे. “निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे यंदा केरळात वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने केरळसह कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापली आहे. तसेच, उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत आहेत. तर, शनिवारपर्यत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागासह आणि तेलंगणा, सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली आहे.