Summer News – उन्हाळ्याची चाहूल लागताच मराठवाड्यात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने सुरू झाली आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उसाच्या रसाला पसंती दिली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.
उन्हाळा आला की रसवंत्या नजरेस पडतात. यंदा देखील मराठवाड्यांतील अनेक शहरांतील मुख्य रस्त्यांवर उसाच्या रसाची दुकाने थाटली गेली आहेत. उन्हाची दाहकता व आरोग्यासाठी चांगला असल्याने जिल्हा ठिकाणांतील मुख्य चौकांत रसवंतीवर नागरिकांची गर्दी होत आहे. बीड शहरातही बसस्टँड परिसरात उसाचा रस काढला जातो. या रसवंतीवर प्रवाशांची गर्दी होत आहे.
मागील काही दिवसांपासून थंडीने काढता पाय घेतल्याने अंबानगरीला दिवसागणिक उन्हाचे चटके वाढू लागले. दिवसा उकाडा तर रात्री थंडी असे सध्याचे वातावरण आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर व परिसराला काहीसे उन्हाचे चटके बसू लागले.
तापमानाची वाटचाल ३१, ३२ अंश सेल्सिअसकडे सुरू झाली आहे. यंदाचा उन्हाळा शहरवासीयांची परीक्षा घेणार, अशी चिन्हे असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मराठवाड्यात विविध ठिकाणी थंड पेयांची दुकाने थाटली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातून ऊस येतो. सध्या उन्हाची दाहकता वाढल्याने लोकांचा कल उसाच्या रसाकडे वाढल्याचे चित्र आहे.
त्यामुळे सुमारे १८ ते २० टन ऊस दररोज येत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले आहे. त्याचमुळे शहरातील विविध परिसरांत सध्या घुंगरांच्या छमछम आवाजात उसाची दुकाणे थाटल्याचे चित्र आहे.
उसाच्या रसाचे फायदे
उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात असलेले फायबर आपल्या पोटाला जास्त काळ तृप्त ठेवते आणि अतिरिक्त वजन घटवण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. उसाचा रस चेहऱ्यावरील पुरळ कमी करण्यासाठी चमत्कारिकरित्या मदत करतो.
नागरिक कोल्ड्रिंक्सला नकार देत ऊस, मोसंबीच्या रसाला ग्राहकांनी पसंती दिली आहे. तापमान वाढले की थंड पेय बनवणाऱ्या विविध देशी विदेशी कंपन्यांची चांदी असते. मात्र नागरिकांनी या शीतपेयांकडे काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
– जावेद खान, स्थानिक ऊस विक्रेता